नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ९६५ वर पोचली आहे. गेल्या २४ तासात ३२८ नवे रुग्ण आढळून आले असून गेल्या २४ तासात १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या ५९ व्यक्तींचा देशात मृत्यू झाला आहे. राज्यात आज ८१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत ५७ नव्या रुग्णांची भर पडली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात ९, नगरमध्ये ९, ठाण्यात ५, बुलडाण्यात १ रुग्ण आढळून आला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४१६ झाली आहे.

राज्यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.