नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात संचारबंदी सुरू असल्यानं सर्व धार्मिक कार्यक्रमांना, सामुहिक प्रार्थनांना मनाई केली आहे. असं असतांनाही आज धुळ्यातल्या भोईवाडा परिसरात एका धार्मिक स्थळामध्ये जमलेल्या ३६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संचारबंदी मोडून प्रतिबंध असतांनाही एकत्र आलेल्या ३६ जणांना ताब्यात घेत चौकशी केली. या सर्वांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.