नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे सर्व गरिबांचं तीन महिन्यांचं वीजबिल शासनानं माफ करावं, सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

50 टक्के वीजबिलातली अर्धी म्हणजे 25 टक्के रक्कम वीज कंपनी ने माफ करावी, तसंच पुढील 4 महिने थकबाकीमुळे कोणाचीही विज जोडणी कापू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.