नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू , तलासरी , बोर्डी , धुंदलवाडी भागांत काल मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता ३ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल होती. याचा केंद्रबिंदू डहाणू जवळ भूगर्भात १० कि.मी. खोलवर होता.

गेल्या आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात हा भूकंपाचा ३ रा धक्का बसला आहे. या अगोदर बुधवारी रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी ३ रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. तो पालघर जिल्ह्यातल्या डहाणू , तलासरी, बोईसर, धुंदलवाडी, बोर्डी चारोटी, कासा आदी भागांत जाणवला होता. आणि त्यानंतर शुक्रवारी रात्री ११ वाजता भूकंपाचे धक्के बसले होते.