नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ विरुद्धच्या लढाईत आवश्यक प्रतिबंधात्मक उपायासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

सरकारने तसेच सरकारी मालकीच्या कोणत्याही कंपनीने दोन वर्षांसाठी प्रसारमाध्यमांवर जाहिराती देऊ नयेत. तसेच २० हजार कोटी रुपयांच्या लुटेन्स दिल्लीच्या पुनर्बांधकामाचे आणि सौंदर्यीकरणाचे काम रद्द करावे असं गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

सरकारनं इस्पितळ बांधण्यावर, वैद्यकीय उपकरणे खरेदीवर भर द्यावा असंही सोनिया गांधी यांनी सुचवलं आहे.