नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नसल्याचा विश्वास कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केला आहे. काल दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. देशात अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असून या हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकार घेईल असं तोमर यावेळी म्हणाले.

संचारबंदीचा शेतकरी आणि मजुरांवर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी सरकारनं आवश्यक ती पावले आधीच उचलली असल्याचंही त्यांनी सांगितलं.