नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकार औद्योगिक उत्पादनं पुन्हा सुरू करण्याची शक्यता पडताळून पहात आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कोरोना विषाणूची बाधा नसलेल्या जिल्ह्यांमधे उत्पादनं पुन्हा कशी सुरू करता येतील, या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उद्योग विभागाला दिल्या आहेत.

मुंबई महानगर विभाग आणि पुणे या सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागात, म्हणजे रेड झोनमधे मात्र कोणत्याही औद्योगिक किंवा व्यावसायिक उपक्रमांना परवानगी दिली जाणार नसल्याचं उद्योग मंत्री देसाई यांनी म्हटलं आहे.