नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चा झालेला उद्रेक लक्षात घेवून केंद्रीय गृह मंत्रालयानं निवडक श्रेणी वगळता भारतामध्ये ‘इमिग्रेशन चेक पोस्ट’च्या माध्यमातून प्रवेश करणा-या अन्य सर्वांचे व्हिसा ३ मेपर्यंत रद्द केले आहेत.

केवळ राजदूत, अधिकारी, संयुक्त राष्ट्राचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे कर्मचारी आणि प्रकल्प अधिकारी या श्रेणीला यातून वगळण्यात आलं आहे.

देशात १०७ इमिग्रेशन चेक पोस्टच्या माध्यमातून प्रवेश करता येतो. मात्र दि. ३ मे,  २०२० पर्यंत भारतामध्ये या मार्गानेही प्रवेश करता येणार नाही, असं गृह मंत्रालयान स्पष्ट केलं आहे.