नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तातडीनं उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना दाखल करून न घेणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिला आहे.

कोरोना विषाणू बाधीत रुग्णांशिवाय अन्य रुग्णांवरही उपचारांची आवश्यकता लक्षात घेऊन रुग्णालय, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्यांविरुद्ध ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.