नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विमान कंपन्यांनी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय अशा कुठल्याही प्रवासाचं तिकीट आरक्षण अजून सुरू करू नये असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आला असल्याचं स्पष्ट झाल्यावर विमान सेवा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल.

तिकिट आरक्षित करण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाईल असं नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे.