नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहेत.
त्यांच्या वडिलांचं आज नवी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं. वडिलांच्या अंत्यविधित कुटुंबातल्या कमीत कमी व्यक्तींनी सहभागी व्हावं असं आवाहनही योगी यांनी केलं आहे.