नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाची चाचणी होत नाही, तोपर्यंत कोवीड १९ विषाणू विरोधातल्या लढाईत यश मिळणं अशक्य असून, चाचणी आणि तपासणी हाच योग्य  मार्ग असल्याचं माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

कोविड १९ मुळे निर्माण झालेलं आव्हान आणि लॉक डाऊन ची परिस्थिती याबाबत आपल्या पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलेलं मनोगत आज काँग्रेसनं व्हिडीओच्या माध्यमातून जारी केलं. देशात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या विस्थापित मजुरांसाठी आपल्या पक्षानं ठोस कार्यक्रम आखायला हवा, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आपल्या राज्यातल्या मजुरांना परत आणण्यासाठी संबंधित राज्यांनी उपाय शोधायला हवा, असं  काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.