नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात शिऊर इथं आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह झालेल्या एका दाम्पत्यानं मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा  २५ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सुपूर्त केला. सामाजिक बांधिलकी म्हणून  विवाह सोहळ्यावर होणारा खर्च या जोडप्यानं वाचवला.

सोलापूर इथल्याही एका जोडप्यानं देखील आज आपला विवाह साधेपणात साजरा करून सामाजिक बांधिलकी म्हणून लग्न सोहळ्याचा खर्च पी.एम. केअर्स निधीसाठी जमा  केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.