नवी दिल्‍ली : गेल्या २४ तासात देशभरात ३ हजार ९०९ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यामुळे देशात आता कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ४६ हजार ४३३ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत १९५ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला असून देशात या विषाणूमुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार ५६८ झाली आहे. १२ हजार ७२७ रूग्णांना उपचारानंतर रूग्णालयातून सोडलं असल्याचं आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाच्या ११ लाख ९१ हजार ९४६ नमुन्यांची तपासणी झाली आहे. आयसीएमआर, अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं ही माहिती दिली आहे. देशभरातल्या ३२० सरकारी, तसंच ११४ खाजगी प्रयोगशाळांमधून या चाचण्या केल्या असून, चाचण्याच्या क्षमतेत वाढ केली जात असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.