नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेशोत्सव अवघ्या साडेतीन महिन्यांवर आला असून, गणेश मूर्ती कारखाने सुरु करायला राज्य सरकारनं परवानगी दिल्यामुळे पेण इथल्या गणेशमूर्ती कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ताळेबंदीमुळे हे काम बंद होते. मास्क आणि सॅनिटायझर चा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर राखणे या अटींवर ही काम आता सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे.