मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यांच्याशिवाय शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनी, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांनी आज विधान भवनात निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सादर केला.

भाजपकडून यापूर्वीच चौघांनी अर्ज दाखल केले असून आज आणखी रमेश कराड यांनीही आपला अर्ज सादर केला आहे.