नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत दारोदारी जाऊन लोकांच्या चाचण्या कराव्यात अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना जागतिक आरोग्य संघटना तसंच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिलेल्या नाहीत, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाचे  मुख्य न्यायाधीश दीपांकर गुप्ता आणि न्यायमूर्ती ए ए सय्यद यांच्या खंडपीठानं ही याचिका निकालात  काढली.