नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आसाममधल्या हैलाकांडी जिल्ह्यात आज सकाळी ६ वाजायच्या सुमाराला दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ मुलांसह ७ जण मृत्युमुखी पडले, तर २ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

सरकारी अधिका-यानं ही माहिती दिली. जखमींना रूग्णालयात जाखल केलं आहे. या भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख द्यायचे आदेश आसामचे मंत्री परिमल सुक्लवैद्य यांनी दिले आहेत.