नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं राबवलं जात असलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत, ३० विमानांनी १९ देशातले ४ हजार १३ नागरिक, महाराष्ट्रात दाखल झाले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे.

या सगळ्यांना विलगीकरणात ठेवलं आहे. यापैकी १ हजार ३०९ नागरिक मुंबईचे आहेत, तर १हजार ६९१ जण राज्यातले आहे. याशिवाय इतर राज्यांमधल्या १ हजार १३ नागरिकांचाही यात समावेश आहे.

त्याच्या प्रवासासाठीचे पास सबंधित राज्यांकडून मिळेपर्यंत या सर्वांना मुंबईतल्या विलगीकरणात ठेवलं असल्याची माहितीही मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे.