नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या २ हजार ५५० नागरिकांना केंद्रीय गृहमंत्रालयानं काळ्या यादीत टाकलं आहे. पुढचे १० वर्ष या नागरिकांना देशात प्रवेश करायला मनाई करण्यात आली आहे. वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

हे नागरिक विसा नियमांचं उल्लंघन विविध राज्यातल्या धार्मिक स्थळांमध्ये राहत होते आणि तिथल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.