मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहू इथून प्रस्थान झालं. परंपरागत पद्धतीनं पण मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचं पालन करून हा प्रस्थान सोहळा संपन्न झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारीचा सोहळा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.