मुंबई : मुंबई पोलिस दलातले एक हजार दोनशे तेहतीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून त्यापैकी तिनशे चौतीस जण पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ही माहिती दिली.

कर्तव्य बजावण्यासाठी आपला जीव पणाला लावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा आपल्याला अभिमान असल्याचं गृहमंत्र्यांनी या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे. कालपर्यंत राज्यातल्या पस्तीस पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी एकवीसजण मुंबईतले, तर इतर कर्मचारी राज्याच्या अन्य भागातले होते.

कोरोना विषाणूची लागण झालेल्यांमधे एकशे सत्त्याण्णव पोलिस अधिकारी आणि एक हजार दोनशे अकरा कर्मचारी असल्याची माहिती सरकारनं दिली आहे.