नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विविध कारणांनी शेतक-यांना पिक कर्ज नाकारणा-या बँकेवर कोणत्या कलमाखाली गुन्हे दाखल करता येतील,याचा अभ्यास राज्य सरकार करत आहे, अशी माहिती वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृह राज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.

वाशिम इथं काल झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. त्यापूर्वी माहिती कार्यालयाची पुस्तिका,भीत्ती पत्रकाचं प्रकाशन त्यांनी केलं.तसंच कौशल्य विकास,उद्योजकतेची मार्गदर्शन केंद्रानं तयार केलेल्या गुगल अर्ज वितरण,समुपदेशन केंद्राचं उदघाटन शंभूराजे देसाई यांनी केलं.