नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संक्रमण अवस्थेत गेलेला नसल्याचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात सापडणाऱ्या जवळपास प्रत्येक रुग्णाला कशामुळं कोरोनाचा संसर्ग झाला हे आपल्याला कळते आहे. त्यामुळं राज्यात समूह संक्रमण सुरू झालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. क्वारंटाइन केलेलेच बहुतांश रुग्ण कोरोनाग्रस्त होत असल्याचं आढळून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.