मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२६ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ७ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप-  १९९ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स –  २२१ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ-  २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १३ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ६१ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक.

■  १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ सातारा जिल्ह्यातील  कराड पोलीस स्टेशनमध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद. त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या १५ वर

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकेल अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईल वर शेअर केली होती.त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय

सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकजण विविध अपद्वारे औषध मागवत आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की अशा अँपद्वारे औषध मागविण्याआधी, सदर अँप वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री करा व मगच  वापरा ,तसेच कुठल्याही अँपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर स्टोअर करू नका . तसेच सदर अँपवरून मागविलेली औषध डिलिव्हरी द्यायला घरी येतील तेव्हा तुम्ही मागविलेले औषध व डिलिव्हरीद्वारे आलेले औषध एकच आहे याची खात्री करा, शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी (Cash on delivery) चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व http://www.cybercrime. gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा.