मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करू नये, असं मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

पुढच्या वर्षी हा उत्सव आपण एकदम जल्लोषात आणि उत्साहात साजरा करू. परंतु यावर्षी संयमी भूमिका घेऊन कोरोना विषाणू महामारीला आळा घालूया, असं आवाहन त्यांनी केलं आहे.