मुंबई : थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, क्रांतिसिंह हा शब्दच ज्यांच्यासाठी असावा असे स्वातंत्र्य सेनानी नाना पाटील होते. त्यांनी प्रतिसरकार स्थापून ब्रिटीश साम्राज्याला हादरा दिला. तरुणांमध्ये क्रांतीचे बीज पेरणारे नाना साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे होते. आयुष्यभर ते मातृभुमीविषयी प्रेम आणि कष्टकऱ्यांबद्दल तळमळ घेऊन जगले. यासाठी त्यांनी प्रसंगी संघर्षही केला. अशा या थोर देशभक्त क्रांतिसिंह नाना पाटील यांना त्रिवार अभिवादन.