नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक २४ शतांश टक्क्यावर पोहचलं आहे. काल ६० हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ लाख ८३ हजार झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

देशात काल ९ लाखापेक्षा जास्त कोवीड नमुन्यांची चाचणी झाली असून आतापर्यंत ३ कोटी ९४ लाख नमुन्यांची चाचणी झाली आहे. या संसर्गानं होणारा मृत्यू दर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के झाला असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.