मुंबई (वृत्तसंस्था) : सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना केलं आहे. आपण स्वत:ही केवळ सोशल मिडीया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्या घरी हा सण साजरा करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या सात-आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचं पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.