मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात काल ४ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ८५ हजार १२२ झाली आहे. याबारोबरच राज्यातल्या करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९२ पुर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांनंतर काल पुन्हा एकदा नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसलं. काल ३ हजार ८३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णांची संख्या १८ लाख २३ हजार ८९६ इतकी झाली आहे. काल राज्यभरातल्या ८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या ४७ हजार १५१ झाली आहे. सध्या राज्याचा कोरोना मृत्यूदर २ पुर्णांक ५९ शतांश टक्क्यावर स्थीर आहे. राज्यात सध्या ९० हजार ५५७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.