नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे.

भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. आता आजचा सामना जिंकून मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याची संधी भारतीय संघाला आहे.