मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग- एसईबीसी अंतर्गत मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीवर, आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.

या स्थगितीमुळे विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया तसेच नोकर भरती प्रक्रियाही थांबली होती. मात्र आजच्या सुनावणीत कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षणावरची स्थगिती उठेल, आणि समाजाला हक्काचा न्याय मिळेल, अशी आशा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी वर्तवली आहे.