नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अॅडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलीयन फलंदाजाना भारतीय गोलदांजासमोर संघर्ष करावा लागत आहे. आज दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ७ बाद ११५ झाली आहे.

भारताच्या जसप्रीत बुमराह यानं २ तर आश्विननं ३ गडी बाद केले. लबुशेन वगळता एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजासमोर टिकाव धरु शकला नाही. त्याआधी आज सकाळी भारताचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत केवळ ११ धावांची भर घालून २४४ धावांवर संपुष्टात आला.