नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातली सर्वात मोठी लसीकरण प्रक्रिया सध्या देशात सुरु असून त्यामुळे देशाला आत्मनिर्भर बनायला हातभार लागला आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं.

कोविड -१९ लसीकरण झालेल्या वाराणसीमधल्या लाभार्थींशी ते दृक श्राव्य माध्यमातून बोलत होते. लसीकरण प्रक्रिया राबवणारे आरोग्यसेवकही यावेळी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात लास घेऊन या सर्वांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.