नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही असे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. एप्रिलपासून संपूर्ण प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत माध्यमांमधून बातम्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

टप्प्याटप्प्यान रेल्वे सेवा सुरु केली जात असून सध्या ६५ टक्क्यांपेक्षा जास्त रेल्वे सुरु असून त्यामध्ये हळूहळू वाढ होईल असंही रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.