नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दुःख व्यक्त केलं आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

मृत मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची, तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्र्यांच्या राष्ट्रीय मदत निधीतून मंजूर केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रावेर, अभोडे आणि विवरे इथं मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले.