नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेगाड़ी तसंच रेल्वेस्थानकांवर मास्क न लावणा-यांना ५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे. देशातल्या करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं सर्व क्षेत्रीय महाव्यवस्थापकांना या संबंधी सूचना दिल्या आहेत. हा आदेश आजपासूनच लागू करण्यात येत असून तो सहा महिन्यासाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.