मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळच पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांच असणार आहे. ५ आणि ६ जुलैला हे आधिवेशन मुंबईत होईल. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या दोन दिवसीय अधिवेशनात प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी होणार नाहीत. फक्त पुरवणी मागणी, तसेच विनियोजन विधेयक आणि इतर महत्वाची विधेयके चर्चेसाठी घेतली जाणार आहेत.