नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नवी दिल्ली येथे चर्चा झाली. जवळपास एक तास चाललेल्या या चर्चेत कोरोना, देशाची अर्थव्यवस्था अशा राष्ट्रीय हिताच्या विषयांवर चर्चा झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.