नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल नव्या ३८ हजार ७९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल ४३ हजार ९१६ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत, तीन कोटी दोन लाख २७ हजार ७९२ रुग्ण, कोरोना मुक्त झाले असून, सध्या चार लाख २४ हजार २५ रुग्ण उपचाराधीन आहेत.