मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल. अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. याबाबत नव्यानं तारखा जाहीर करण्यात येथील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिलं जाणार नाही, असं आवाहनही सामंत यांनी केलं.