मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येत्या १ ते ७ ऑक्टोबर या काळात वन्यजीव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं वन्यजीव सप्ताहाचं निमित्त साधून  निसर्ग माहिती केंद्रानं निसर्गप्रेमींसाठी ही संधी खुली केली आहे. या सप्ताहात उद्यानातली शिलोंडा पायवाट, येऊर, नागला ब्लॉक या भागांत प्रत्यक्ष चालत निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे. यावेळी निसर्गप्रेमींसोबत निसर्गतज्ज्ञ असतील. वन्यजीव महोत्सवात वन्यजीवांची सुटका आणि त्यांचे पुनर्वसन, अंतरा, फुलपाखरांची ओळख आदी विषयांवर ऑनलाइन उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.