नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याच दर ९८ टक्क्यांच्या जवळ पोचला आहे. देशभरात काल कोविड १९ चे २३ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ कोटी ३२ लाखापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९९ शतांश टक्के झाला आहे. काल १८ हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले, तर २१४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात सध्या २ लाख ३० हजारापेक्षा जास्त एक्टिव रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.