मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे. काल ९७२ रुग्ण बरे होऊन गेले, ९६३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख २७ हजार ८३८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ७१ हजार ७६३ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४० हजार ६९२ रुग्ण दगावले. राज्यात सध्या ११ हजार ७३२ एक्टीव्ह रुग्ण आहेत.