मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के झालं आहे.  काल ९४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ६७८ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३५ हजार ६५८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ८३ हजार ४३५ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४० हजार ९५७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ७ हजार ५५५ अॅक्टीव्ह रुग्ण  आहेत.