नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल अनेक दिवांनंतर १० हजाराहून अधिक १३ हजार १५४ इतक्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ७ हजार ४८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आत्तापर्यंत देशभरातले ३ कोटी ४२ लाख ५८ हजाराहून जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा कोरोना मुक्तीदर किंचित घसरून ९८ पूर्णांक ३८ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशभरात ८२ हजार ४०२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.