मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ८५ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ४३ रुग्ण आंतराष्ट्रीय प्रवासी आहेत तर ४ त्यांच्या सहवासातले आहे. गंभीर बाब म्हणजे या ८५ रुग्णांपैकी ३८ रुग्णांनी कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. पुण्यातल्या आयसर अर्थात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेनं केलेल्या समुदाय सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले. या रुग्णांमधले १९ मुंबईतले, ५ कल्याण-डोंबिवलीतले, नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमधले प्रत्येकी ३ रुग्ण आहेत. तर प्रत्येकी २ रुग्ण वसई-विरार आणि पुणे शहरातले तर एक रुग्ण ठाणे शहर, पनवेल, भिवंडी आणि पुण्याच्या ग्रामीण भागातला आहे. राज्यात काल कोरोनाच्या ३ हजार ९०० नव्या रुग्णांची नोंद झाली तर १ हजार ३०६ रुग्ण बरे झाले. २० कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळं राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. सध्या राज्यात सुमारे सव्वा लाख रुग्ण गृह विलगीकरणात आहेत तर ९०५ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत आणि १४ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.