नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत एकूण २६३० जण ओमायक्रोन ने बाधित झाले असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.  त्यातील महाराष्ट्रात ७९७ जण असून त्याखालोखाल दिल्लीत ४६५, राजस्थान २३६ आणि केरळमध्ये २३४ रुग्ण मिळाले आहेत.  तर आतापर्यंत ९९५ जण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात  देशभरात ९० हजार ९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. परवा आढळलेल्या नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा कालची रुग्णसंख्या जवळजवळ दुप्पट आहे. सध्या देशभरात २ लाख ८५ हजार ४०१ कोविड रुग्ण उपचार घेत असून रुग्ण बरे होण्याचा दर  ९७ पूर्णांक ८१ शतांश टक्के आहे. गेल्या २४ तासांत १९ हजाराहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत तर ३२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.