नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रविवारी ३० जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सकाळी साडेअकरा वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा पंचाऐशीवा भाग असेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात होईल, असं प्रधानमंत्री कार्यालयानं कळवलं आहे.