नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरा होण्याचा दर ९५ पूर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात २ लाख ४६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ कोटीच्या वर गेली आहे. काल १ लाख ४९ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, १ हजार ७२ रुग्णांचा मृत्यू झाला.  सध्या देशभरात १४ लाख ३५ हजार ५६९ एक्टीव्ह रुग्ण आहेत. देशातला सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर १३ पूर्णांक ३ शतांश टक्के आहे.